ईशा फाउंडेशन कोइंबतूर यांच्या वतीने “नदी अभियान भारताचे कल्याण”. याच्या अंतर्गत कावेरी नदीची हाक या जनजागृती कार्यक्रमाची सुरुवात झाली.सद्गुरू श्री जग्गी वासुदेव यांनी तळकावेरी पासून हे अभियान सुरू केले आहे.भारतातील प्रमुख नद्यापैकी असलेल्या कावेरीचे पुनरुजीवन करण्यासाठी ही हाक आहे.यात जनजागृती करून ४२ रु प्रतीरोप दान करून २४ कोटी झाडे लावून त्यांचे संगोपन करून कावेरी नदीच्या पात्रात पाणी साठविण्याची क्षमता निर्माण करायची आहे.यासाठी आज सकाळी ७.३० ते ९.३० या वेळात ईशा फाउंडेशनच्या स्वयंसेवकांनी पुणे शहरातील १२ मुख्य चौकात भर पावसात उभे राहून नागरिकांना आवाहन केले.या कार्यात सहभागी होण्यासाठी व अधिक महितीसाठी संपर्क cauverycalling.org अथवा 8000980009.
छायाचित्र :फर्ग्युसन कॉलेज चौकात जनजागृती करताना स्वयंसेवक
© 2011. Peoples Media Pune