आषाढी एकादशी निमित शांतिनिकेतन सेवा प्रतिष्ठान व स्वामी बॅग्ज परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने आषाढी एकादशी निमित्त क्षेत्र प्रती पंढरपूर विठ्ठलवाडी येथे यंदाच्याही वर्षी प्रसादरूपी आकरा हजार रोपांचे वाटप करण्यात आले. यात आंबा,फणस,पेरु,वड,चिंच,कडूनिंब,पिंपळ,औदुंबर यासारखी निसर्गाला उपयुक्त वृक्ष,तसेच विविध प्रकारची फुलझाडे यांचे वाटप करण्यात आले.या प्रसंगी शांतिनिकेतन सेवा प्रतिष्ठानचे दीपक परदेशी,स्वामी बॅग्जचे राहुल जगताप,महेंद्र मारणे,मनोज उत्तेकर,सूरज परदेशी,गणेश चौधरी,अविनाश खंडारे,प्रफुल्ल चिटणीस आदि मान्यवर उपस्थित होते.उपक्रमचे हे विसावे वर्ष आहे.धार्मिक कार्या बरोबरच पर्यावरण रक्षणासाठी या उपक्रमाचे आयोजन केल्याचे राहुल जगताप यांनी नमूद केले.
छायाचित्र :रोपाचे वाटप करताना मान्यवर
© 2011. Peoples Media Pune