पूर्वीची बंदिस्त अर्थव्यवस्था बदलून आता जगतिकीकरण झाले आहे.मात्र उद्योगा समोरील आव्हाने कमी झाली नाहीत कारण आपली धोरणे उत्तम आहेत मात्र त्यांची अंमलबजावणी आजूनही नोकरशाही नोकरशाही करते जी अजुन ब्रिटिशकालीन मानसिकतेत आहे.देश तंत्र ज्ञानात कमी नाही.व मोठ्या लोकसंखेने प्रचंड संधि आहेत.असे प्रतिपादन मगरपट्टा सिटीचे अध्यक्ष सतीश मगर व ज्येष्ट्र उद्योजक-लेखक पद्मश्री प्रतापराव पवार यांनी केले. ते कै.आप्पासाहेब सावळे स्मृति व्याख्यान मालेतील मुलाखतीत बोलत होते. याचे आयोजन रोटरी क्लब टिळकरोड,शनिवारवाडा,कात्रज,साऊथ,ईस्ट,हिलसाईड,रॉयल यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले. मराठा चेंबर्सच्या टिळकरोड येथील पद्मजी हॉल येथे झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी नियोजित प्रांतपाल रवी धोत्रे,अनंत सरदेशमुख अध्यक्ष मराठा चेंबर्स,रोटरी क्लब टिळकरोडचे अध्यक्ष श्रीकांत सरपोतदार,रो.संतोष परदेशी,अनंत तिकोने,मोहन पटवर्धन,संगीता मानियार,रो.चंद्र्कांत डांगे आदि मान्यवर उपस्थित होते.या कार्यक्रमात अनंत सरदेशमुख यांनी उद्योग- काल आज व उद्या या विषयावर सतीश मगर व प्रतापराव पवार यांची खुमासदार मुलाखत घेतली.
छायाचित्र :सतीश मगर,व प्रतापराव पवार यांचा सत्कार करतांना मान्यवर
© 2011. Peoples Media Pune