“सफल मानवी जीवनासाठी भौर्तिक व आध्यात्मिक असे दोन पंख असणे आवश्यक असते.फक्त वस्तू,धनसंपदा व साधने जमा करून उपयोग नाही कारण याने आनंद मिळेलच असे नाही.कारण आनंद बाहेरील वस्तुत नसतो तर मनात असतो.अध्यात्माने मनाची शांति,आनंद तर मिळतोच पण पारलौकिक जीवनात ही याचा उपयोग होत्तो.म्हणून भौतिक व आध्यात्मिक अशा दोन्ही बाबीत संतुलन केले पाहिजे”,असे प्रतिपादन प.पु सुधांशुजी महाराज यांनी केले.ते विश्वजागृती मिशन पुणे मंडलच्या वतीने आयोजित विराट भक्ती सत्संग कार्यक्रमात मार्गदर्शन करीत होते.वर्धमान सांस्कृतिक केंद्र मार्केटयार्ड येथे झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी घनश्याम झंवर(अध्यक्ष पुणे मंडल),गणेश कामठे (उपाध्यक्ष पुणे मंडल),विष्णूभगवान आगरवाल(महासचिव),देवराज कटारिया(जनरल सेक्रेटरी दिल्ली मुख्यालय).आदी मान्यवरांच्या बरोबरच नागरिक मोठ्या संखेने उपस्थित होते.
छायाचित्र :दीपप्रज्वलन करताना सुधांशुजी महाराज,घनश्याम झंवर,विष्णूभगवान आगरवाल व अन्य
© 2011. Peoples Media Pune