नवनाथ येवले(येवले चहा),माधुरी दातार(२६ भाषा आवगत),पद्मा साळुंखे(फॅशन डिझायनर),निलेश गायकवाड(अंदमान सफर),रोहिदास थोपटे(दुग्ध व्यवसाय)यांना व्हीएनएस निर्माण व्हेंचर्सच्या वतीने दिला जाणारा पहिला “यशस्वी उद्योगरत्न" पुरस्कार व्यंगचित्रकार चारुहास पंडीत यांच्या हस्ते देण्यात आला.पुष्पगुच्छ,व मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप होते.मंत्रा बँक्वेट हॉल कोथरूड येथे झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी सचिन भोसले(व्हीएनएस निर्माण व्हेंचर्स),अमरसिह देशमुख(माजी जिल्हापरिषदअध्यक्ष),डॉ.दत्तात्रय गायकवाड(बीव्हीजी ग्रुप)प्रकाश चव्हाण,संतोष वायचळ,नितीन जाधव,अॅड अविनाश गायकवाड,मच्छिंद्र धुमाळ,वैशाली वर्णेकर(सूत्रसंचालक),सुहास फडणीस,अमित शहाणे,शितल अप्पा लोखंडे, उत्तम नाले आदी मान्यवरांच्या बरोबरच विविध क्षेत्रातील मान्यवर व उद्योजक,कुटूंबिय व नागरिक उपस्थित होते.या प्रसंगी बोलताना चारुहास पंडीत यांनी उद्योजकांनी नेहमी वेगळा विचार केला पाहिजे,यश मिळविण्याची जिद्द कायम ठेवली पाहिजे असे सांगितले.यावेळी अनेक नवउद्योजकांचा सत्कार करण्यात आला.तसेच उद्योगरत्न पुरस्कार मिळालेल्या उद्योजकांची वैशाली वर्णेकर यांनी मुलाखत घेतली यातून त्यांचा प्रवास उलगडत गेला.याप्रसंगी बोलताना सचिन भोसले यांनी शून्यातून विश्व निर्माण करणारे नवउद्योजक यांना पुरस्कार देवून त्यांना प्रगतीसाठी प्रेरणा देणे हा या पुरस्काराचा हेतू असल्याचे सांगितले. छायाचित्र:पुरस्कार प्राप्त उद्योजक व मान्यवर यांचे समूह चित्र
© 2011. Peoples Media Pune