शांतिनिकेतन सेवा प्रतिष्ठान व स्वामी बॅग यांच्या वतीने आषाढी एकादशी निमित्त सोमवार दिनांक २३ जुलै रोजी आकरा हजार रोपांचे वाटप करण्यात येणार आहे.प्रती पंढरी मानल्या जाणा-या श्रीक्षेत्र विठ्ठलवाडी येथे हे वाटप करण्यात येईल.उपक्रमाचे हे १९ वे वर्ष आहे.“वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरी”,या संत तुकाराम महाराजांच्या उपदेशातून या उपक्रमाचा उदय झाला.या रोपांमध्ये बहुगुणी तुळस,फुलझाडे,फळझाडे,शेतकरी बांधवांसाठी उपयुक्त ठरणारी आंब्याची,फणसाची,कडुलिंब व अन्य रोपांचे पांडुरंगाचा प्रसाद म्हणून वाटप होईल.अनेकदा ब-याच ठिकाणी दुष्काळाचा सामना करावा लागतो.अशा ठिकाणी वृक्षारोपण हे जलसंजीवनी ठरते,तसेच पर्यावरण व मानवाचे रक्षण व्हायचे असेल तर वृक्षांना पर्याय नाही असे मत स्वामी बॅगचे संचालक राहुल जगताप यांनी व्यक्त केले.या उपक्रमात राहुल जगताप,मनोज उत्तेकर,शांतिनिकेतन सेवा प्रतिष्ठानचे बाळाभाऊ परदेशी(सर),सौ.मिथीला जगताप,यांनी पुढाकर घेतला आहे.
© 2011. Peoples Media Pune