Peoples Media Pune header

Go Back

आषाढी एकादशीला आकराहजार रोपांचे स्वामी बॅगच्यावतीने वाटप

17 Jul 2018

शांतिनिकेतन सेवा प्रतिष्ठान व स्वामी बॅग यांच्या वतीने आषाढी एकादशी निमित्त सोमवार दिनांक २३ जुलै रोजी आकरा हजार रोपांचे वाटप करण्यात येणार आहे.प्रती पंढरी मानल्या जाणा-या श्रीक्षेत्र विठ्ठलवाडी येथे हे वाटप करण्यात येईल.उपक्रमाचे हे १९ वे वर्ष आहे.वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरी,या संत तुकाराम महाराजांच्या उपदेशातून या उपक्रमाचा उदय झाला.या रोपांमध्ये बहुगुणी तुळस,फुलझाडे,फळझाडे,शेतकरी बांधवांसाठी उपयुक्त ठरणारी आंब्याची,फणसाची,कडुलिंब व अन्य रोपांचे पांडुरंगाचा प्रसाद म्हणून वाटप होईल.अनेकदा ब-याच ठिकाणी दुष्काळाचा सामना करावा लागतो.अशा ठिकाणी वृक्षारोपण हे जलसंजीवनी ठरते,तसेच पर्यावरण व मानवाचे रक्षण व्हायचे असेल तर वृक्षांना पर्याय नाही असे मत स्वामी बॅगचे संचालक राहुल जगताप यांनी व्यक्त केले.या उपक्रमात राहुल जगताप,मनोज उत्तेकर,शांतिनिकेतन सेवा प्रतिष्ठानचे बाळाभाऊ परदेशी(सर),सौ.मिथीला जगताप,यांनी पुढाकर घेतला आहे.

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite